शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला ‘ब्रेक’ : राजकीय हवा बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:32 IST

कोल्हापूर : कर्जमाफीसह एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल जनमाणसांत तयार झालेल्या नाराजीमुळे जिल्ह्यांतील इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या निकालाकडेही डोळे; भाजपच्या विरोधात गेल्यास काँग्रेस उचल खाणारशेट्टींसारखा नेता महाआघाडीतून बाहेर पडून भाजपवर आक्रमक टीका करू लागला

कोल्हापूर : कर्जमाफीसह एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल जनमाणसांत तयार झालेल्या नाराजीमुळे जिल्ह्यांतील इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. जे त्या पक्षात जाणार होते ते सावध झाले असून, घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेण्याची त्यांना भीती वाटत आहे. काहींनी तर भाजपचा नाद सोडल्याची स्थिती आहे.

गुजरातच्या निवडणुकीत काय होते याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले असून तिथे निकाल भाजपच्या विरोधात गेल्यास जिल्ह्यातही दोन्ही काँग्रेस पुन्हा उचल खाण्याची चिन्हे आहेत.माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा प्रवेश बारगळलाच आहे. त्यांना स्थानिक राजकारणातून विरोध झालाच शिवाय शेट्टी यांनीही त्यांना त्यापासून परावृत्त केले. खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी त्यांचा भाजपबरोबरचा वावर इतका वाढला होता की पालकमंत्र्यांनी त्यांची उमेदवारीच जाहीर करायची तेवढे बाकी राहिले होते परंतु त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वावर पुन्हा वाढला आहे. चंदगड मतदार संघातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर या देखील पक्षात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या कन्या नंदाताई बाभूळकर या भाजपच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होत्या; परंतु त्यांनीही भाजपकडे वळविलेले पाय मागे घेतले आहेत.

समरजित घाटगे हे विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून जास्तच आक्रमक झाल्यामुळे संजयबाबा घाटगे यांचीही स्थिती दोलायमान झाली आहे. माजी खासदार निवेदिता माने यांचेही भाजप प्रवेशासाठी नाव चर्चेत होते परंतु ती हवाही बसली आहे. धैर्यशील माने यांनी आपण लोकसभा लढवणार परंतु अजून झेंडा ठरलेला नाही, असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचेही नाव भाजपमधून चर्चेत होते परंतु त्यालाही ब्रेक लागला आहे. शिवसेनेचे सहापैकी किमान दोन आमदार भाजपच्या संभाव्य यादीत होते; परंतु बदललेल्या राजकीय स्थितीमुळे त्यांनीही सावध पवित्रा घेतला आहे.

भाजप सत्तेवर आल्यानंतर सत्तेच्या सावलीत जाण्यासाठी अक्षरक्ष: चढाओढ सुरू झाली होती. त्यामध्ये समरजित घाटगे, अरुण इंगवले, अनिल यादव, अशोक स्वामी, अशोक चराटी, राहुल देसाई, अशोकराव माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर आदींचा समावेश होता. त्यातील घाटगे यांना ‘म्हाडा पुणे’चे अध्यक्षपद मिळाले. अशोक स्वामी यांच्या पत्नीस इचलकरंजीचे नगराध्यक्षपद मिळाले. चराटी यांना आजरा कारखान्याची सत्ता मिळाली. इतरांना अजून तरी म्हणावा तसा राजकीय लाभ झालेला नाही.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दर दोन-तीन महिन्यांनी पत्रकार अचंबित होतील, असा नेता भाजपमध्ये येणार असल्याचे सांगत होते; परंतु आता या सगळ्याच घडामोडी थंडावल्या आहेत.वाढत्या नाराजीमुळे त्यांचेही पाय थबकले..राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल शेतकºयांत कमालीची नाराजी आहे. जीएसटी, महागाईपासून जिल्ह्याचे अनेक प्रश्न असे आहेत की त्याबद्दल सरकार बदलले म्हणून फारसा फरक पडलेला नाही. सर्वसामान्य जनतेला जो त्रास, भ्रष्टाचार यापूर्वी सहन करावा लागत होता त्यातही काहीच फरक पडलेला नाही. ‘गुड गव्हर्नन्स’ची हवा झाली. त्याचा कायदाही झाला परंतु प्रत्यक्षात हेलपाटे कमी झालेले नाहीत. शिवसेनेसारखा घटकपक्ष सत्तेत असूनही रोज एक आंदोलन करू लागला आहे. खासदार राजू शेट्टींसारखा नेता महाआघाडीतून बाहेर पडून भाजपवर आक्रमक टीका करू लागला आहे. भाजपसारखा फसवा पक्ष नाही, असा त्यांच्या टीकेचा रोख आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सोशल मीडियावरही भाजप सरकारबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. जनमाणसांतही तीच भावना आहे. यामुळे जे भाजप प्रवेशासाठी रांगा लावून बसले होते त्यांचे पाय थबकले आहेत.नंदाताई बाभूळकर या भाजपच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होत्या; परंतु त्यांनीही भाजपकडे वळविलेले पाय मागे घेतले आहेत.समरजित घाटगे हे विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवारम्हणून जास्तच आक्रमकझाल्यामुळे संजयबाबा घाटगे यांचीही स्थिती दोलायमानझाली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर